तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध 2023 | Sant Tukdoji Maharaj Information In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध म्हणजेच sant tukdoji maharaj history in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध म्हणजेच sant tukdoji maharaj information in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध | sant tukdoji maharaj history in marathi in 100 , 200 and 300 words

तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध 100 शब्दात | sant tukdoji maharaj information in marathi in 100 words

तुकडोजी महाराज यांचा कालखंड 1909 ते 1967 असा आहे . तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते . तुकडोजी महाराज यांनी अंधश्रद्धा घालवण्यासाठी आणि जातिभेद नष्ट करण्यासाठी कीर्तनाच्या प्रभावी वापर केला . तुकडोजी महाराज ग्रामगीता नावाचे काव्य लिहिले . लोकांना प्रबोधन करताना खंजिरी भजन हा प्रकार त्यांनी वापरला .

तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे असे होते . तुकडोजी महाराज यांच्या गुरुचे नाव आडकोजी असे होते . तुकडोजी महाराज मराठी व हिंदी भाषा बोलत . तुकडोजी महाराज आधुनिक काळातील महान संत होते. तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली येथे झाला . संत तुकडोजी महाराज म्हणतात ” हर देश मे तू, हर वेश मे तू ,तेरे नाम अनेक ,तू एक ही है ” .

तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध 200 शब्दात | sant tukdoji maharaj information in marathi in 200 words

महाराष्ट्रातील एक आधुनिक संतभक्त, कवी व समाजसुधारक असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे होते . अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला . तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते .

अडकोजी महाराज हे त्यांचे गुरू त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू अडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले . विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते . एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला . सन 1942 च्या भारत छोडो आंदोलन दरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. आते है नाथ हमारे हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्ती ठरले होते .

या राष्ट्रसंतांनी आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला . तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीने एकेश्वरवादाचा पुरस्कार करीत असत . आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक ,सामाजिक व राष्ट्रीय प्रबोधन केले.

राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले केले . त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल.

तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध 300 शब्दात | sant tukdoji maharaj information in marathi in 300 words

भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती . महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात असलेला यावली शहीद या गावी 30 एप्रिल 1990 रोजी तुकडोजी महाराजांचा जन्म झाला . त्यांच्या घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणीपासून असताना ध्यान ,भजन, पुजन या गोष्टींची आवड निर्माण झाली .

तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली वरखेड ला आजोळी असताना अडकुजी महाराजांना त्याने गुरु केले. पुढे किर्तन भजन यासाठी ते स्वतः कविता रचू लागले . एके दिवशी गुरु महाराजांनी त्यांना तुकड्या म्हणून हाक मारली तुकड्या म्हणे असे म्हणत जा असे सांगितले . तुकड्या म्हणे या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले . त्यामुळे तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले . समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली .

sant-tukdoji-maharaj-information-in-marathi

ग्रामोनत्ती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता . भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपुर कल्पना होती . त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात याविषयी उपाययोजनाही सुचविली . अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे . त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे . ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाड्मय सेवेची पुढची सोय.

देवभोळेपणा ,जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले . महिलोनत्ती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता . कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था ,राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रिया अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अज्ञान काय आहे हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले .

देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील . नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण अश्विन कृष्ण पंचमी शके 1890 ( 31 ऑक्टोंबर 1967 ) रोजी झाले अशा या महान संतांना मनापासून शतशः प्रणाम.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध म्हणजेच sant tukdoji maharaj history in marathi बद्दल चर्चा केली . तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध म्हणजेच sant tukdoji maharaj information in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

संदर्भ – विकिपीडिया

Leave a Comment