माझा भारत देश मराठी निबंध 2023 | Maza Bharat Desh Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण माझा भारत देश मराठी निबंध म्हणजेच maza bharat desh essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . माझा भारत देश मराठी निबंध म्हणजेच Bharat Maza Desh Aahe Marathi Essay – Maza Desh Marathi Nibandh हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

माझा भारत देश मराठी निबंध | Maza Desh Marathi Nibandh | Bharat Maza Desh Aahe Marathi Essay In 100 , 300 , 500 and 700 Words

माझा भारत देश मराठी निबंध 100 शब्दात | Maza Bharat Desh Essay In Marathi In 100 Words

संस्कृत मध्ये एक म्हण आहे जननी जन्मभूमि:च स्वर्गाद्पी गरीयसी म्हणजे जननी आणि जन्मभूमीच्या स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते . भारत आमची जन्मभूमी आहे . आमच्या देशातील अनेक महान गोष्टींनी हे सिद्ध करून दाखवले आहे . की ही भूमी खरोखरच स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. आणिअनेक प्रकारच्या विविधतेने युक्त असा हा देशाने येथे जाती-धर्म, चालीरीती यांमध्ये विविधता आहे. भारत बहुसंख्य खेड्यांचा देश आहे .

माझा भारत देश मराठी निबंध 2021 | Best Maza Bharat Desh Essay In Marathi | Bharat Maza Desh Aahe Marathi Essay

या देशातील अधिकांश लोक खेड्यात राहतात . शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे . आमच्या देशाला अतिप्राचीन संस्कृती आणि वैभव याची उज्वल परंपरा आहे . . विविधतेत शुद्ध व एकता आणि अखंडता असणारा हा एकमेव देश आहे . या देशाच्या समृद्ध आणि भिन्न परंपरांचा मला अभिमान आहे . मेरा भारत महान उक्ती अगदी सार्थ आहे.

माझा भारत देश मराठी निबंध 300 शब्दात | Bharat Maza Desh Aahe Marathi Essay In 300 Words

भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी प्रतिज्ञा आपण करतो. भारत हा असा एकमेव देश आहे की जिथे सर्व जाती धर्माचे लोक येथे एकत्र राहतात . म्हणून या देशाला सर्वधर्मसमभाव असलेला देश म्हणतात . भारत माझा देश आहे आणि विविधतेने नटलेला या माझ्या भारत देशात विविधता असूनही एकता आहे . अनेक जाती-धर्माचे लोक माझ्या भारतात आनंदाने राहतात . भारतात जरी अनेक भाषा बोलल्या जात असल्या तरी भारताची राष्ट्र भाषा हिंदी आहे . माझ्या भारतात अनेक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात .

भारत हा लोकशाही प्रधान महान देश आहे माझ्या भारत देशाला महान परंपरा लाभलेली आहे . “भा” या शब्दांमधील म्हणजे तेज आणि “रत” म्हणजे रममाण झालेला . तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत आहे . भारत देशात आणि पशुपक्षी, निसर्ग, भाषा, धर्म या सगळ्या बाबतीत विविधता आहे . तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे . कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे . आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे . वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे . गंगा नदी ही भारताची राष्ट्रीय नदी आहे.

माझा भारत देश मराठी निबंध 2021 | Best Maza Bharat Desh Essay In Marathi | Bharat Maza Desh Aahe Marathi Essay

या नैसर्गिक विविधतेने भारत देश नटलेला आहे . भारत देश हा दक्षिण आशियातील एक प्रमुख देश आहे . आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. आपल्या भारत देशासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले . त्यांच्या या महान कार्यामुळे ते 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले . भारत देशातील अनेक खेळाडू ,कलावंत ,शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी भारताचे नाव उंचावले आहे . तसेच इतिहास ,भूगोल, खगोलशास्त्र ,गणित, विज्ञान या सगळ्या शास्त्रांमध्ये भारत देशाने खूप प्रगती केली आहे . भारत हा कृषीप्रधान देश आहे.

भारतातील ८०% टक्के लोक शेती करतात . उद्योगांमध्ये सुद्धा अनेक उद्योगपतींनी भारताचे स्थान उंचावलेले आहे. दिवसेंदिवस आपला भारत देश विकसित होत आहे . पण थोडा विचार केला तर भ्रष्टाचार आणि गरिबी देशाच्या विकासाच्या आड येत आहे . भारताचे नागरिक म्हणून भ्रष्टाचार आणि गरिबी थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत . असा विविध कलागुणांनी सजलेला माझा भारत देश आहे आणि याचा मला खूप अभिमान आहे.

माझा भारत देश मराठी निबंध 500 शब्दात | Maza Bharat Desh Essay In Marathi In 500 Words

भारत माझा देश आहे माझा देश सुंदर आणि महान आहे . भारत देशात विविध धर्म ,भाषा ,वेशभूषा संस्कृती ,सण तसेच नैसर्गिक विविधतेने नटलेला असा देशात भारत देश असा एकमेव देश आहे . की जेथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात . त्यामुळे भारत देशाला सर्वधर्मसमभाव असलेला देश म्हणून ओळखले जाते . “भा” शब्दांमधील म्हणजे तेज आणि “रत” म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत देश होय. भारत देश हा दक्षिण आशियातील एक प्रमुख देश आहेत.

भारताच्या उत्तरेला उंच हिमालय पर्वत रांगा आणि दक्षिणेला लांब समुद्र आहेत . भारत देशाची संस्कृती अन्य देशांच्या तुलनेने वेगळे आहे . भारत देश हा अनेक नेते ,महापुरुष ,क्रांती वीरांची भूमी आहे . भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले . 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले . भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो . भारतातील 80 टक्के लोक शेती करतात. भारतातील प्राणी ,पक्षी ,फळे,फुले, नद्या या सगळ्या बाबतीत विविधता आहे. माझ्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी ,तर मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.

आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून कमळ हे राष्ट्रीय फूल आहे. गंगा नदी ही भारताची राष्ट्रीय नदी आहे. जी भारतातील पवित्र नदी म्हणून ओळखले जाते . तसेच यमुना ,गोदावरी ,सतलज या नद्यांमुळे माझा देश सर्वगुणसंपन्न झालेला आहे . माझ्या भारत भूमीवर अनेक महान विरांचा नेत्यांचा ,संतांचा ,कलावंतांचा जन्म झाला आहे . जसे श्री राम, स्वामी विवेकानंद ,छत्रपती शिवाजी महाराज ,गौतम बुद्ध यांनी सर्व भारतीयांना एक आदर्श निर्माण करून दिला. माझ्या देशात अनेक थोर विभूती होऊन गेल्या जसे वर्धमान महावीर, महात्मा गांधीजी इत्यादी त्यांचे तत्त्वज्ञान अघात आहे . माझ्या भारताची भूमी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम इत्यादी महान संताच्या अमूल्य विचारांनी पवित्र झाली आहे .

माझा भारत देश मराठी निबंध 2021 | Best Maza Bharat Desh Essay In Marathi | Bharat Maza Desh Aahe Marathi Essay

आणि संत रामदास ,संत नामदेव अशा संतांनी पवित्र विचार भारताला दिले . भारत देशात अनेक खेळाडू ,कलावंत, लेखक, खगोलशास्त्र ,वनस्पतिशास्त्र , शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी भारताचे नाव उंचावले आहे. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात भारत देशाने खूप प्रगती केली आहे . भारतीय जवान स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले संरक्षण करतात. यांच्यामुळेच आपला भारत देश सुरक्षित आहे . अनेक शूर वीरांनी माझ्या भारत देशासाठी प्राणांची आहुती दिली . माझ्या देशात अनेक नामवंत कलाकार खेळाडू शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांचे विचार नगण्य आहेत . अनेक उद्योग प्रतिनिधी उद्योगाच्या क्षेत्रात देशाचे नाव उंचावले आहे. माझा भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. जय जवान जय किसान हे आपल्या देशाचे ब्रीदवाक्य आहे.

भारताच्या उत्तरेला उंच हिमालय पर्वत आहे त्याच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे . असा माझा भारत देश सुजलाम सुफलाम आहे तरीही माझ्या भारत देशाला आजही अनेक समस्या भेडसावत आहेत . त्या आपण सर्वांनी मिळून दूर करूया आणि आपल्या भारत देशाला विश्वात महान देश बनवूया. “भारत देश महान आमचा ,भारत देश महान, स्फूर्ती देतील , हेच आमचे राम कृष्ण हनुमान ​” . भारत देशाला प्रगतिपथावर असला तरीही गरिबी ,बेरोजगारी ,अंधश्रद्धा ,भ्रष्टाचार या गोष्टी भारत देशाच्या विकासाच्या आड येत आहेत.

भारत देशाचे एक नागरिक म्हणून आपण या गोष्टी रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारत माझा देश आहे आणि माझ्या देशावर खूप प्रेम आहे असे नुसते म्हणून उपयोग नाही तर या समस्यांचा नायनाट करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे . जेव्हा या सर्व समस्या नष्ट होतील तेव्हा भारत देश हा खऱ्या अर्थाने विकसित देश आहे असे म्हणता येईल.

माझा भारत देश मराठी निबंध 700 शब्दात | Maza Bharat Desh Essay In Marathi In 700 Words

भारत माझा देश आहे आणि मला माझ्या देशाचा अभिमान आहे. मला माझ्या देशाच्या परंपरा, सांस्कृतिक भावना, जीवनमूल्यांचा अभिमान आहे आणि नेहमीच असेल. भारत हा जगातील सातव्या क्रमांकाचा आणि सर्वात मोठा देश आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा आणि दाट लोकसंख्या असलेला देश आहे. भारताला भारत, हिंदुस्थान असेही म्हणतात. आपल्या देशाची राजधानी दिल्ली आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, जो हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन या सर्व धर्माच्या लोकांना समान मान्यता देतो. भारतात 29 राज्ये आहेत आणि सर्व राज्यांची स्वतःची खास भाषा आहे, आणि तरीही आपण सर्व भारतीय एका धाग्यात बांधलेले आहोत. पौराणिक कथेनुसार, आपल्या देशाचे नाव प्राचीन हिंदू राजा भरत याच्या नावावरून ठेवण्यात आले होते. भारताची हडप्पा आणि मोहेंजोदारोची सभ्यता आजही जगप्रसिद्ध आहे. देशाच्या मातीची अनुभूती आणि तिचा सुगंध वर्णन करता येत नाही.

भारताला विविधतेचा देश म्हटले जाते. आपल्या देशाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बी.आर.आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हटले जाते. संविधान सभेच्या 389 सदस्यांनी देशाशी संबंधित सर्व समस्यांचे तपशीलवार परीक्षण करण्यासाठी समित्यांची स्थापना केली. आपल्या देशाच्या संविधानाने प्रत्येक देशवासीयांना समान अधिकार दिले आहेत. आपला देश हा लोकशाही देश आहे, इथे प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. पाकिस्तान, नेपाळ, बर्मा, बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया आणि श्रीलंका हे भारताचे शेजारी देश आहेत.

आपल्या देशाची संस्कृती आणि सखोल इतिहास संपूर्ण जगाला स्वतःकडे आकर्षित करतो. येथील ऐतिहासिक वास्तू, इमारतींचे वास्तू, अनेक दशकांचे सार्वजनिक जीवन आणि तोही जुना इतिहास पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. भारत हा एक देश आहे जो आपली संस्कृती आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतो.

भारतात वेगवेगळ्या ऋतूंचे आगमन सर्वांनाच पाहायला मिळते. प्रत्येक ऋतूचे स्वतःचे महत्त्व आहे. भारत त्याच्या सौंदर्यासाठी आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या हिमालय पर्वतांसाठी ओळखला जातो. तो सर्वात उंच पर्वत आहे. इथे नेहमीच बर्फ पडतो. हिमालय पर्वत अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींपासून देशाचे रक्षण करतो आणि देशाला सुरक्षा प्रदान करतो. गंगा, यमुना, नर्मदा, ताप्ती, गोदावरी आणि कृष्णा यांसारख्या प्रचंड नद्या भारतात वाहतात. या सर्व नद्या सिंचन आणि शेती उत्पादनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. मात्र वाढत्या प्रदूषणामुळे नद्यांवर वाईट परिणाम होत आहे. नद्यांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय फूल कमळ आणि राष्ट्रीय फळ आंबा आहे. भारताचा राष्ट्रध्वज अशोक चक्रासह तिरंगा, भगवा, पांढरा आणि हिरवा आहे. भारताचे राष्ट्रगीत “जन गण मन” जे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते. राष्ट्रगीताशिवाय कोणताही समारंभ संपत नाही. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत लिहिले. देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे पण बहुतेक लोकांना क्रिकेट जास्त आवडते. अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे.

भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. इंग्रजांनी जवळपास दोनशे वर्षे भारतावर राज्य केले, लुटले आणि भारताला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले. भारतीयांवर अत्याचार केले आणि फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण स्वीकारून हिंदू-मुस्लीममध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारताच्या ऐतिहासिक वीरांमध्ये चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, नेताजी, राणी लक्ष्मीबाई आणि इतर अनेक स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश आहे.

भारतातील विविध भाषा, विविध धर्म असूनही लोक त्यांच्या हृदयात प्रेम, आपुलकी आणि बंधुभाव ठेवतात. विविधतेतील एकतेचे हे सुंदर उदाहरण आहे. अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक देश म्हणून उदयास आला. भारताची अर्थव्यवस्था जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि देशाचे चलन रुपया आहे.

भारतातील प्रत्येक राज्यात मंत्रमुग्ध करणारी पर्यटन स्थळे आहेत जी तुमचे मन जिंकतील. ताजमहाल ही जगातील प्रसिद्ध इमारत आहे जी शाहजहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधली होती. भारत हा एक असा देश आहे जिथे ताजमहाल, फतेहपूर सिक्री, सुवर्ण मंदिर, कुतुबमिनार, लाल किल्ला, उटी, निलगिरी, काश्मीर, खजुराहो, अजिंठा आणि एलोरा लेणी इत्यादी प्रसिद्ध वास्तू तसेच त्यांची वास्तुकला आणि कोरीव काम आहे. हा महान नद्या, पर्वत, दऱ्या, तलाव आणि महासागरांचा देश आहे.

आपला भारत महान नेत्यांचा आणि स्वातंत्र्यसैनिकांचा देश आहे. आपल्या देशाचे दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्यासाठी भारतीय जवान नेहमीच सीमेवर तैनात असतात. छत्रपती शिवाजी, महात्मा गांधी, नेताजी, जवाहरलाल नेहरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी महान नेत्यांनी देशाला आणि देशवासीयांना योग्य मार्ग दाखविला. ती नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळणे कठीण झाले असते. अशी अनेक अज्ञात नावे आहेत, जी इतिहासाच्या पुस्तकात नाहीत, पण त्यांनीही देशहितासाठी सर्वस्वाचा त्याग केला होता.

भारतात लोक सर्व धर्मांनुसार सण साजरे करतात. लोक होळी, भारतातील रंगांचा सण, दिव्यांनी भरलेली दिवाळी, रक्षाबंधन, भाऊ-बहिणीचा सण, दसरा, ईद, ख्रिसमस, लोहरी, पोंगल, सर्व प्रकारचे सण साजरे करू शकतात. भारतीय खाद्यपदार्थ जगभरात लोकप्रिय आहेत.

प्रत्येक राज्याचे स्वतःचे खास खाद्य असते, ज्याचा आस्वाद आपण सर्व देशवासीय घेतात. सर्व राज्यांचे स्वतःचे स्वादिष्ट पदार्थ आहेत, सरसो के साग ते दक्षिण भारतातील इडली डोसा असो, प्रत्येकजण या पदार्थाचा आनंद घेतो. रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यासारखे साहित्य आणि त्यातील मूल्ये आपल्याला जीवनाच्या मार्गावर चालण्यास आणि योग्य आणि अयोग्य फरक करण्यास शिकवतात.

आज आपण सर्वांसमोर आपले म्हणणे ठेऊन, रात्री शांत झोपत शांततेत आणि स्वातंत्र्यात हिंडत आहोत

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण माझा भारत देश मराठी निबंध म्हणजेच Bharat Maza Desh Aahe Marathi Essay बद्दल चर्चा केली . माझा भारत देश मराठी निबंध म्हणजेच maza bharat desh essay in marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा .

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment