नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध म्हणजेच dr apj abdul kalam essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . apj abdul kalam marathi nibandh म्हणजेच essay on apj abdul kalam in marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया abdul kalam marathi essay ….
Table of Contents
डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध | apj abdul kalam marathi nibandh | essay on apj abdul kalam in marathi in 100 , 300 and 500 words
डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध 100 शब्दात | dr apj abdul kalam essay in marathi in 100 words
डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव डॉ अब्दुल पाकिर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असे आहे . त्यांचा जन्म 15 ऑक्टोंबर 1931 आली तामिळनाडू राज्यातील रामेश्वर येथे झाला . त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्या यात्रेकरुंना होडीतून धनुष्कोडी आणणे व नेण्याच्या व्यवसाय करत होते . डॉ कलाम यांच्या लहान वयातच त्यांचे वडील वारल्यामुळे त्यांच्यावर घरची जबाबदारी येऊन पडली . त्यामुळे ते गावात वर्तमानपत्रे विकून अन लहान मोठी कामे करुन पैसे कमवीत असतात .
आणि घरी मदत करत असतात . त्यामुळे त्यांचे बालपण खूप कष्टात गेले .डॉक्टर कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम ला पूर्ण केले . शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड होती . नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये बीएससी पास झाले . त्यानंतर त्यांनी मदत मद्रास इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला त्यावेळी प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते त्यासाठी त्यांच्या बहिणीने त्यांना पैशाची मदत केली . या संस्थेमधून डिप्लोमा पूर्ण झाले त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले .

1963 मध्ये त्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचं सॅटॅलाइट लॉन्चिंग वेहिकल च्या संशोधन भाग घेतला होता . क्षेपणास्त्र विकास संशोधन मधील अग्नी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले . आपल्या सहकार्यान मधील उत्तम गुणांचा उपयोग देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी करून घेण्याची कला त्यांच्यात होती . डॉ कलाम खूप संवेदनशील व साधे होते . त्यांना मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता . भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण ,पद्मभूषण आणि भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा गौरव केला .
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपती पदी डॉ कलाम यांची निवड झाली. ते युवकांना कायम प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व होते . 27 जुलै 2015 रोजी डॉक्टर कलाम यांनी शिलॉन्ग मधील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भारत देशाला महासत्ता देश बनवण्याचे स्वप्न ते सतत पाहत होते.
डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध 300 शब्दात | dr apj abdul kalam essay in marathi in 300 words
डॉ एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती प्रसिद्ध ,वैज्ञानिक ,महान विचारवंत तसेच प्रतिभावंत लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांचे पूर्ण नाव डॉ अब्दुल पाकिर जैनुलाबदिन अब्दुल कलाम हे होते . त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वर येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाबदिन आणि आईचे नाव अशीयम्मा होते . कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने कलाम गावात वर्तमानपत्रे विकून तसेच अन्य लहान मोठी कामे करुन पैसे कमवीत .
त्यांचे बालपण खूप कष्टात गेले . शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली . नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले . शालेय वयात ते अभ्यासामध्ये सामान्य होते पण काहीतरी नवीन शिकण्यासाठी नेहमी तयार असायची . बीएस्सी नंतर त्यांनी मद्रास इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला . शाळेत प्रवेशासाठी लागणारे पैसेही नसताना त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले . मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉज या संस्थेतून एरोनॉटिक्स डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले .
1963 मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेत ( इस्त्रो ) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनात त्यांनी भाग घेतला . डॉ कलाम व्ययतीक कामापेक्षा सांघिक कामगिरी व भर देत असत . सहकार्यांमध्ये उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती . त्रिशूल ,पृथ्वी ,आकाश व अग्निबाण निर्मितीचे ते प्रणेते होते . क्षेपणास्त्र विकास कार्यामधील अग्नी पृथ्वी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे तसेच पोखरण येथील दुसऱ्या अनुचाचणी नंतर अब्दुल कलाम हे भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले .

त्याबरोबर त्यांनी इंडिया माय ड्रीम इंडिया, 2020 ए विजन फोर द न्यू मिलेनियम ,विंग्स ऑफ पावर इत्यादी असून अधिक उत्कृष्ट सरस पुस्तके लिहिली . त्यांचे लेखन कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे . या थोर विभूतीचा भारत सरकारने पद्मभूषण ,पद्मविभूषण व 1998 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन सन्मान केला . 2002 सालि हे भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले . याच कार्यकाळात नंतर ते पुन्हा शिक्षण लेखन आणि सार्वजनिक कार्यात परतले . अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोंबर हा जन्मदिवस त्यांच्या अजोड कार्यामुळे जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
पुढील वीस वर्षात होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न पाहणारे ते प्रेरणादायी थोर विचारवंत होते . डॉ कलाम हे आयुष्यभर अविवाहित व पूर्ण शाकाहारी राहिले . विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ कलाम मनाने खुप संवेदनशील व साधे होते . त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा ,मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता . मेघालयातील शीलॉन्ग च्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट येथे पृथ्वी नावाचा जिवंत ग्रह तयार करणे हे व्याख्यान देत असताना . 27 जुलै 2015 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले . त्यांच्या निधनामुळे भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रातील एक तेजस्वी तारा निखळला.
- Read Also – Republic Day Essay In Marathi
Essay 1 – डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध 500 शब्दात | dr apj abdul kalam essay in marathi in 500 words
स्वप्न ते नवे जे झोपल्यानंतर पडतात ,तर खरे स्वप्न ते असतात जे पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला झोपू देत नाही . या तत्वाने आयुष्यभर जगणारे व भारताला जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न दाखवणारी भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम होय . अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अब्दुल पकिर जैनुलब्दीन अब्दुल कलाम होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोंबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम या छोट्या गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला . त्यांचे वडील रामेश्वरला येणार्या यात्रेकरुंना आणण्याचा – नेण्याचा व्यवसाय करत होते .
त्यांच्या आईचे नाव अशियंम्मा होते . डॉ कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. डॉ कलाम आपल्या गावात वर्तमानपत्रे विकून तसेच अन्य लहान मोठी कामे करुन पैसे मिळून घराला आर्थिक मदत करीत असत. त्यांचे बालपण कष्टात गेले . शालेय जीवनात त्यांचा गणित या विषयात अधिक आवड वाढू लागली . शालेय शिक्षणानंतर सेट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली येथे त्यांनी बीएससी चे शिक्षण पूर्ण केले . त्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी प्रवेश घेऊन एरोनॉटिक्स डिप्लोमा पूर्ण केला . या प्रसंगी त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले . 1958 ते 1963 डॉक्टर कलाम यांचा संबंध संरक्षण संशोधन व विकास संस्था डीआरडीओ बरोबर आला . 1963 मध्ये ते भारतीय संशोधन संस्था अर्थात इस्त्रोच्या क्षेपणास्त्र विकासातील संशोधनात भाग घेऊ लागले . इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम यावेळी डॉ कलाम पुन्हा डीआरडीओ मध्ये आले . इस्रो मध्ये डॉ कलाम सॅटॅलाइट लॉन्चिंग वेहिकल या प्रकल्पाचे प्रमुख होते .
भारतातील विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ कलाम यांनी यशस्वीपणे सांभाळली . अवकाश संशोधनाला डॉ कलाम यांनी भारताला येथे एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले . वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर होता. आपल्या सहकारातील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती . अग्नी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉक्टर कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले . पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार व संरक्षण मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली .

भारत सरकारने त्यांच्या योगदानाबद्दल पद्मभूषण ,पद्मविभूषण व भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मानित करण्यात आले . सदैव देशाचा व विज्ञानाचा विषय डोक्यात असणारे डॉ कलाम अत्यंत साधे व संवेदनशील होते . डॉ कलाम यांना रुद्रवीणा वाजण्याचा ,मुलांना शिकवण्याच्या व त्यांच्याशी गप्पा मारण्याचा छंद होता . डॉ कलाम आयुष्यभर अविवाहित राहिले . अग्निपंख हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध व प्रेरणादायी आहे . त्यांनी भारतातील युवकांच्या भारताच्या महासत्तेची बीज रोवले . 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 या काळात त्यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून सर्वोच्च पद भूषवले .
त्याकाळात आपल्या वेगवेगळ्या कार्यपद्धतीने व साधेपणामुळे ते लोकप्रिय राष्ट्रपती झाले . वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत आपले शिक्षण पूर्ण करून देशाच्या अवकाश संशोधनात गरूड झेप घेणारे अब्दुल कलाम आयुष्यभर स्वतःला विद्यार्थी समजत होते . 27 जुलै 2015 रोजी डॉ कलाम यांचे व्याख्यान देत असताना निधन झाले . भारताला अवकाश संशोधन मोठे यश मिळवून देणारे व युवकांसाठी सदैव प्रेरणा देणारे डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन .
Essay 2 – डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध 500 शब्दात | dr apj abdul kalam essay in marathi in 500 words
परिचय
ए.पी.जे. अब्दुल कलाम हे भारताचे 11 वे राष्ट्रपती असलेले अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांचे संक्षेप आहे. आतापर्यंत, ए.पी.जे. अब्दुल कलाम हे भारताचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती होते, बहुतेक तरुणांमध्ये. भारताच्या वैज्ञानिक आणि धोरणात्मक विकासात त्यांचे योगदान अभूतपूर्व आहे.
बालपण आणि शिक्षण
श्री कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे झाला. त्यांचा जन्म जैनुलाब्दीन नावाचा मालक आणि स्थानिक मशिदीत इमाम आणि त्यांची पत्नी आशिअम्मा यांच्या पोटी झाला. कलाम हे चार भाऊ आणि एका बहिणीमध्ये सर्वात लहान होते. त्यांचे बालपण खडतर आणि गरिबीत होते आणि त्यांनी वृत्तपत्र फेरीवाले म्हणून काम करून कुटुंबाचा खर्च तसेच स्वतःचा अभ्यासही चालविला.
श्री कलाम हे बालपणी अभ्यासात सरासरी होते पण शिकण्याची तीव्र इच्छा असल्याने ते शिक्षकांमध्ये ओळखले जातात. त्याने बराच वेळ अभ्यास केला, विशेषतः गणित, त्याला आवडणारा विषय.
त्यांचे प्रारंभिक शालेय शिक्षण रामनाथपुरम येथील श्वार्ट्झ उच्च माध्यमिक विद्यालयात झाले आणि त्यानंतर ते तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ महाविद्यालयात गेले. तेथून त्यांनी 1954 मध्ये भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली.
त्यानंतर, श्री कलाम यांनी एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला.
शास्त्रज्ञ म्हणून करिअर
श्री कलाम यांना भारतीय हवाई दलात फायटर पायलट व्हायचे होते. 1960 मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरोस्पेस अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर, त्यांनी हवाई दलात फायटर पायलट होण्यासाठी अर्ज केला, परंतु केवळ फुसफुसून संधी हुकली. क्वालिफायरमध्ये तो नवव्या स्थानावर दिसला, तर फक्त आठ स्थाने होती; कदाचित नियतीने त्याच्यासाठी काहीतरी वेगळं ठेवलं होतं.
त्यांचे जीवन स्वप्न इतके जवळून गमावल्यानंतरही, श्री कलाम यांनी त्यांच्या क्षमतेवरील विश्वास गमावला नाही आणि ते DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) मध्ये शास्त्रज्ञ बनले. असे दिसून आले की श्री कलाम DRDO मधील त्यांच्या नोकरीबद्दल फारसे समाधानी नव्हते.
1969 मध्ये त्यांची इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) मध्ये बदली झाली. त्यानंतर ते 1980 मध्ये रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या तैनात करून भारताच्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे (SLV-III) प्रकल्प संचालक बनले.
त्याशिवाय कलाम यांनी 1970 ते 1990 च्या दशकात अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रकल्पांवरही काम केले होते. 1980 च्या दशकात श्री. कलाम यांच्या दिग्दर्शनाखाली एरोस्पेस प्रकल्पांना केंद्र सरकारकडून पाठिंबा आणि निधी उपलब्ध करून देण्यात यश आले.
श्री कलाम यांनी जुलै 1992 ते डिसेंबर 1999 या काळात भारताच्या पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही काम केले होते. या काळात त्यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक म्हणूनही काम केले. मे 1998 मध्ये घेतलेल्या पोखरण-II अणुऊर्जा चाचणीचे ते मुख्य प्रकल्प समन्वयक देखील होते.
राजकीय कारकीर्द
कलाम यांचे नाव भारताच्या राष्ट्रपतीसाठी सत्ताधारी एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) सरकारने जून 2002 मध्ये प्रस्तावित केले होते. त्यांच्या उमेदवारीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि समाजवादी पक्षासारख्या इतर पक्षांनी पाठिंबा दिला होता.
माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनीही राष्ट्रपतीपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने कलाम यांच्यासाठी मैदान स्पष्ट झाले. कलाम यांचे एकमेव विरोधक स्वातंत्र्यसैनिक आणि आझाद हिंद फौजेचे दिग्गज लक्ष्मी सहगल होते. श्रीमती सहगल; भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (CPI(M)), क्रांतिकारी समाजवादी पक्ष आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या चार डाव्या पक्षांचा पाठिंबा होता.
मात्र, कलाम यांच्या लोकप्रियतेमुळे आणि कौशल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली. त्यांनी 2002 च्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आणि 922,884 मते मिळवली आणि त्यांच्या विरोधक लक्ष्मी सहगल यांच्या 107,366 मतांच्या विरोधात त्यांनी मत मिळवले.
कलाम यांनी 25 जुलै 2002 रोजी भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आणि त्यांचा कार्यकाळ 25 जुलै 2007 रोजी संपला.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण dr apj abdul kalam essay in marathi म्हणजेच apj abdul kalam marathi nibandh बद्दल चर्चा केली . essay on apj abdul kalam in marathi म्हणजेच abdul kalam marathi essay हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व essay on abdul kalam in marathi हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा .
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.